सायंकाळी ६ वाजता नगीना घाट येथील नव्याने बांधलेल्या घाटावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांसाठी अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट आरतीची थाळी सजविलेल्या आणि आकर्षक वेशभुषा केलेल्या २१ महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
हरिद्वार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला लाखो महिला अशा प्रकारे गंगेची आरती करतात.
त्याच धर्तीवर नांदेड येथे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सोहळ्याची सुरुवात होत असल्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थीत राहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.







