Friday, July 30, 2010

‘बाभळी’चे काटे रूतले.

पोटनिवडणुक डोळ्यापुढे ठेवून केलेला बाभळीचा स्टंटसुद्धा चंद्राबाबूंना वाचवू शकला नाही.
चंद्राबाबूच्या मोहर्‍यांना त्यांचं डिपॉजीटसुद्धा वाचवता नाही आलं. ihikhik
या स्टंटमुळे सहानुभूतीची लाट येईल असे चंद्राबाबूंना वाटले होते, पण महाराष्ट्राच्या पाण्यात आहेच अशी ताकद की भल्या-भल्यांना या लाटेचा तडाखा खावा लागतो. encem
आता गोदावरीत येऊन पापक्षालन करा म्हणावं त्यांना.sengihnampakgigi

Sunday, July 25, 2010

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


तुम्हां सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या हातून गुरूंची सेवा घडत राहो आणि त्याच गुरूंच्या आशिर्वादांमुळे तुमचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी प्रार्थना.

Thursday, July 22, 2010

पाऊस परतला.


काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस आज परत विजांच्या प्रचंड कडकडाटात धो-धो बरसतोय.



Tuesday, July 20, 2010

ड्रामा कंपनी आता औरंगाबादला

ड्रामा कंपनीचा मुक्काम आता धर्माबादमधून हलला असून त्यांची पालं आता औरंगाबादच्या फाईव्ह स्टार जेलमध्ये पडणार आहेत.
तसं तर त्यांना कालच औरंगाबाद जेलमध्ये हलवण्याचे ठरले होते आणि सगळा तसा बंदोबस्तही झाला होता पण चंद्राबाबूंनी A.C. गाडीसाठी अक्षरशः जमिनीवर लोळण घेतली होती.
आज महाराष्ट्र सरकारने ५०,००० रूपये खर्च करून एक स्पेशल AC बस मागवली होती.
थोड्याच वेळापुर्वी चंद्राबाबूंना त्यांच्या समर्थकांसह औरंगाबाद जेलकडे रवाना करण्यात आले आहे
आजही चंद्राबाबू आणि त्यांचे समर्थक जागेवरून हलायला तयार नव्हते पण पोलीसांना बळाचा उपयोग करून त्यांना बसमध्ये बसवले.

तत्पूर्वी चंद्राबाबूंच्या काही आमदार/खासदार समर्थकांनी पोलीसांशीच धक्काबुक्की केली होती.
शेवटी परीस्थीती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच (आणि इतर कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून) पोलीसांना चंद्राबाबू समर्थकांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
या लाठीमाराचा थोडासा प्रसाद खोट्य़ा बातम्या पसरवणार्‍या आंध्रातल्या मिडीयावाल्यांनासुद्धा मिळाला.tepuktangan

या नौटंकी कंपनीने महाराष्ट्र सरकार आणि पोलीसांवर अनेक खोटे आरोप केले, जसे की ‘आम्हाला चांगले जेवायला दिले जात नाहीये’, ‘पिण्याच्या पाण्याची सोय नाही’, ‘AC नाही’, वगैरे वगैरे.
पण ‘स्टार माझा’चे पत्रकार श्री. योगेश लाठकर आणि श्री. राहूल कुलकर्णी यांनी या बातमीला योग्य ते कव्हरेज मिळवून दिले आणि सत्य परिस्थीती सगळ्यांपुढे आणली.sembah

बघुयात आता पुढे काय होते ते....


ता. क. :- २० जुलै २०१० (३:१९ PM)
थोड्या वेळापूर्वी आंध्र-महाराष्ट्र सिमेवर तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच हल्लाबोल केला.
काचेच्या बाटल्या आणि दगडफेकीत ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सौजन्य :- झी २४ तास।


ता. क. :- (९:४९ PM) २१ जुलै २०१०

चंद्राबाबूंना अक्षरशः हाकललं. (स्टार माझा)

चंद्राबाबूंना काल नांदेडहून औरंगाबादला नेल्यानंतरची ही बातमी.

बाभळी बंधा-याच्या मुद्द्यावरुन महाराष्टात घुसखोरी करणारे आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची अखेर हैदराबादला रवानगी करण्यात आलीय.
त्यांना हैदराबादला पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत चंद्राबाबूंची नाटकं सुरुच होती. बाबूंना हैदराबादेत धाडण्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली असताना त्यांनी विमानात बसण्यास नकार दिला. अखेर महाराष्ट्र सरकारनं त्यांना जबरदस्तीनं विमानात बसवलं आणि हैदराबादला रवाना केलं.
त्याआधी घुसखोऱी करणा-या चंद्राबाबूंच्या विरोधातले सगळे गुन्हे मागे घेण्यात आलेत. राज्य सरकारनं निर्देश दिल्यानंतर नांदेडच्या एसपी आणि कलेक्टरनं यासंदर्भातलं शिफारसपत्र मॅजिस्ट्रेटपुढे सादर केलं. स्वताच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रशासनास वेठीस धरु पाहणा-या चंद्राबाबूंचा खेळ तूर्तास थांबणार आहे।



P. S. :- 21 July 2010 7:04 PM

तेलगु तर तेलगु, पण आता हिंदी/इंग्रजी न्युज चॅनल्ससुद्धा चंद्राबाबू नायंडूची बाजू घेत आहेत.
ह्याला प्रांतवाद नाही म्हणत का ?
marah

http://www.youtube.com/watch?v=beL4aabWNUA

Saturday, July 17, 2010

चंद्राबाबू नायडूंना न्यायालयीन कोठडी.

जमावबंदीचा नियम मोडून बाभळी बंधार्‍याकडे यायला निघालेल्या आंध्राच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या चंद्राबाबू नायडूंना कालच पोलीसांनी अटक केली होती.
बंधार्‍यावर जाऊ देणार नसाल तर अटक करा’ असाच त्यांचा पवित्रा होता.

पोलीसांनी चंद्राबाबूंसह १०० जणांना काल अटक केली होती, यात ४८ आमदार व ८ खासदारांचा समावेश आहे.
चंद्राबाबूंना आज न्यायालयात आणले असतांना त्यांनी जामीन नाकारला.
चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्यासोबतच्या आमदार/खासदारांना २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काल बाभळी बंधारा कृती समिती (सर्वपक्षीय)च्या वतीने धर्माबादमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, डॉ. बालाजी कोंपलवार यांच्यासह इतरही पदाधिकार्‍यांनी केले.
यावेळी या सर्वांची भाषणेही झाली.
या मोर्चामध्ये उमरी, नायगाव, धर्माबाद, कुंडलवाडी आदी परीसरांमधून गावकरी मंडळी सामिल झाली होती.

मुळात हा सगळा प्रकार म्हणजे एक राजकीय स्टंटबाजीच आहे.
येत्या काही दिवसांतच आंध्रप्रदेशात विधानसभा पोटनिवडणूका आहेत, त्यात आंध्रातील जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच चंद्राबाबू हा स्टंट करत आहेत.
मागे २-३ वर्षांपूर्वीसुद्धा आंध्राच्या काही खासदार/आमदारांनी असाच प्रयत्न केला होता, पण तेव्हा खुद्द गावकर्‍यांनीच त्यांना पळवून लावले होते.



कालच्या प्रकरणामध्ये गावकर्‍यांची भुमिका :-

जनतेच्या मनात प्रचंड रोष असला तरी, काल धर्माबादकरांनी माणुसकी म्हणून आंध्रातून आलेल्या चंद्राबाबू समर्थकांना पाणी पाजले व खिचडी खाऊ घातली.
काल नांदेडमध्ये (धर्माबाद) प्रवेश करतांना चंद्राबाबू न्युज चॅनल्सच्या पत्रकारांना आंध्रातून सोबत घेऊनच आले होते.
धर्माबादकरांना आज कळाले की आंध्रातील पत्रकार आंध्रामध्ये चुकीच्या, खोट्या बातम्या प्रसारीत करत आहेत.
खोट्या बातम्या प्रसारीत कराल तर तुमच्या OB Van जाळून टाकू.’ असा सज्जड इशाराच गावकर्‍यांनी न्युज चॅनेल्सच्या पत्रकारांना दिलाय.


सुप्रीम कोर्टामध्ये बाभळी प्रश्नाची सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे, आता सगळ्यांचेच लक्ष तिकडे लागले आहे.



यासंदर्भातल्या काही बातम्या :-

"बाभळी'ला विरोध ही राजकीय स्टंटबाजी
बंदी धुडकावणाऱ्या चंद्राबाबूंना अटक
चंद्राबाबू अटकेत
पाणीप्रश्‍नावर लढणारा 'फाईव्हस्टार' आंदोलक !



बाभळी बंधार्‍याचा वाद माहित नसलेल्यांसाठी :-
काय आहे बाभळी बंधा-याचा वाद?

Wednesday, July 14, 2010

कै.डॉ. शंकरराव चव्हाण

महाराष्ट्राचे शिल्पकार, गोदाकाठचा कर्मयोगी, राजकारणातील हेडमास्तर, महाराष्ट्राचे जलशंकर, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक ही आणि अशी अनेक नावे कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांना अगदी सार्थ वाटतात.


कै.डॉ. शंकरराव चव्हाण
यांची आज जयंती आहे.
अशा या सुप्रीम नांदेडीअनच्या स्मृतीस "नांदेडीअन्स"च्या वतीने विनम्र अभिवादन !

Thursday, July 8, 2010

मंगळवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस.

मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली गेटच्या अंडरब्रीजला असे स्वरूप आले होते.









ता.क. :- १३ ऑगस्ट २०१० (11:20 AM)
किड्स किंग्डम शाळेच्या बसच्या ड्रायव्हरने आज ४०-५० मुलांचा जीव धोक्यात घातला होता.
त्या साहेबांनी इतके पाणी असतांनाही आणि मुलं नको म्हणत असतांनाही बस सरळ पाण्यात उतरवली होती.
भुयारी मार्गाच्या मध्यभागी आल्यावर बसमध्ये पाणी शिरले आणि ती बंद पडली.gigitjari
मग काय ? ड्रायव्हर साहेब मुलांना तसंच सोडून तिथून पळून गेले.
मुलांचा ओरडण्याचा आवाज ऎकून आसपासचे लोक तीथे धावत आले आणि त्यांनी त्या लहान मुलांना वाचवले.doa
धन्य ते ड्रायव्हर साहेब.marah
मी आत्ताच ही बातमी झी २४ तासवर पाहिली.

Friday, July 2, 2010

धो डाला !

एखाद्या दुःस्वप्नासारखा आलेला यावर्षीचा उन्हाळा, असह्य करणारा उकाडा, आणि त्यात भर म्हणून की काय कोरडे गेलेले मृग नक्षत्र पाहता निसर्गाची नांदेडवर अवकृपा झाली की काय असे वाटू लागले होते.
पण जूनच्या २८ तारखेपासून थोडीफार विश्रांती घेत पाऊस बर्‍यापैकी पडतोय.

कालच्या पावसाने तर नांदेडको धो डाला. (काल "घन ओथंबून येती" या ब्लॉगपोस्टवर अपडेट दिले होते.)
काल संध्याकाळी ४:३० वाजता सुरू झालेला पाऊस रात्री १२ वाजेपर्यंत अविरत सुरूच होता.
शेवटी शेवटी पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी सुरूवातीच्या तीन तासांच्या मुसळधार पावसाने नांदेडीअन्सची त्रेधातिरपिट उडवून टाकली होती.


कालच्या या दणकेबाज पावसाच्या काही बातम्या :-

Lokmat
पावसाची घुसखोरी
विष्णूपुरीच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ
जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी
हदगाव-तामसा रस्ता दोन दिवसांपासून बंद

Esakal