Wednesday, December 10, 2008

मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले ई-गव्हर्नर

राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कार्यकुशलतेची व लोकाभिमुख नेतृत्वाची झलक दाखविण्यास सुरूवात केली आहे.

राज्यातील कोणताही नागरिक आता त्यांच्याशी ई-मेल करून संवाद साधू शकतो आणि आपल्या सुचना किंवा तक्रारी त्यांच्यापुढे मांडू शकतो.


लोकांच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न, सूचना मुख्यमंत्र्यांना थेट पाठवता याव्यात यासाठी चव्हाण यांनी नवा ईमेल तयार केला आहे.


ashokchavanmind@rediffmail.com

असा पत्ता त्यांनी मीडियामार्फत मंगळवारी राज्यभरात पाठवला.


अशोकराव चव्हाण यांचा या माध्यमातून राज्यातील जनमाणसांची प्रतिमा जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
शासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राज्याचे माहिती व जनसंपर्क खात्यात काही बदल करून ते सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.



मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा ई-मेल आय.डी. राज्यातील जनतेला देवून 'हायटेक' नेतृत्वाची झलक दाखविली आहे.
आणि त्यांच्या ह्या कृतीद्वारे त्यांनी लोकांपुढे ई-गव्हर्नन्सची संकल्पना मांडली आहे.





-- सत्यप्रभा

0 comments:

Post a Comment

Post a Comment