Friday, December 11, 2009

राज्य शासनाचे उत्कृष्ठ वावाङ्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर.

डिसेंबर ०९


नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्र राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावेळी नांदेडच्या दोन साहित्यिकांचा पुरस्कारप्राप्त लेखकांमधे समावेश झालेला आहे.

विजय पाडळकर यांच्या 'गंगा आये कहॉं से - गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास' या साहित्यकृतीला ललित कला आस्वादपर लेखन या विभागातला पु.ल. देशपांडे पुरस्कार
तर
डॉ. भगवान अंजनीकर यांच्या 'महापुरूषांचे चरित्रचिंतन' या पुस्तकास बालवाङ्मय (कविता) या विभागातला ना. वा. टिळक पुरस्कार मिळाला आहे.


या दोन्ही नांदेडीअन्सचे आपल्या नांदेडीअन्स ब्लॉगतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम साहित्यकृती घडाव्यात यासाठी शुभेच्छा. :-)

0 comments:

Post a Comment

Post a Comment