Tuesday, July 20, 2010

ड्रामा कंपनी आता औरंगाबादला

ड्रामा कंपनीचा मुक्काम आता धर्माबादमधून हलला असून त्यांची पालं आता औरंगाबादच्या फाईव्ह स्टार जेलमध्ये पडणार आहेत.
तसं तर त्यांना कालच औरंगाबाद जेलमध्ये हलवण्याचे ठरले होते आणि सगळा तसा बंदोबस्तही झाला होता पण चंद्राबाबूंनी A.C. गाडीसाठी अक्षरशः जमिनीवर लोळण घेतली होती.
आज महाराष्ट्र सरकारने ५०,००० रूपये खर्च करून एक स्पेशल AC बस मागवली होती.
थोड्याच वेळापुर्वी चंद्राबाबूंना त्यांच्या समर्थकांसह औरंगाबाद जेलकडे रवाना करण्यात आले आहे
आजही चंद्राबाबू आणि त्यांचे समर्थक जागेवरून हलायला तयार नव्हते पण पोलीसांना बळाचा उपयोग करून त्यांना बसमध्ये बसवले.

तत्पूर्वी चंद्राबाबूंच्या काही आमदार/खासदार समर्थकांनी पोलीसांशीच धक्काबुक्की केली होती.
शेवटी परीस्थीती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच (आणि इतर कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून) पोलीसांना चंद्राबाबू समर्थकांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
या लाठीमाराचा थोडासा प्रसाद खोट्य़ा बातम्या पसरवणार्‍या आंध्रातल्या मिडीयावाल्यांनासुद्धा मिळाला.tepuktangan

या नौटंकी कंपनीने महाराष्ट्र सरकार आणि पोलीसांवर अनेक खोटे आरोप केले, जसे की ‘आम्हाला चांगले जेवायला दिले जात नाहीये’, ‘पिण्याच्या पाण्याची सोय नाही’, ‘AC नाही’, वगैरे वगैरे.
पण ‘स्टार माझा’चे पत्रकार श्री. योगेश लाठकर आणि श्री. राहूल कुलकर्णी यांनी या बातमीला योग्य ते कव्हरेज मिळवून दिले आणि सत्य परिस्थीती सगळ्यांपुढे आणली.sembah

बघुयात आता पुढे काय होते ते....


ता. क. :- २० जुलै २०१० (३:१९ PM)
थोड्या वेळापूर्वी आंध्र-महाराष्ट्र सिमेवर तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच हल्लाबोल केला.
काचेच्या बाटल्या आणि दगडफेकीत ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सौजन्य :- झी २४ तास।


ता. क. :- (९:४९ PM) २१ जुलै २०१०

चंद्राबाबूंना अक्षरशः हाकललं. (स्टार माझा)

चंद्राबाबूंना काल नांदेडहून औरंगाबादला नेल्यानंतरची ही बातमी.

बाभळी बंधा-याच्या मुद्द्यावरुन महाराष्टात घुसखोरी करणारे आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची अखेर हैदराबादला रवानगी करण्यात आलीय.
त्यांना हैदराबादला पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत चंद्राबाबूंची नाटकं सुरुच होती. बाबूंना हैदराबादेत धाडण्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली असताना त्यांनी विमानात बसण्यास नकार दिला. अखेर महाराष्ट्र सरकारनं त्यांना जबरदस्तीनं विमानात बसवलं आणि हैदराबादला रवाना केलं.
त्याआधी घुसखोऱी करणा-या चंद्राबाबूंच्या विरोधातले सगळे गुन्हे मागे घेण्यात आलेत. राज्य सरकारनं निर्देश दिल्यानंतर नांदेडच्या एसपी आणि कलेक्टरनं यासंदर्भातलं शिफारसपत्र मॅजिस्ट्रेटपुढे सादर केलं. स्वताच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रशासनास वेठीस धरु पाहणा-या चंद्राबाबूंचा खेळ तूर्तास थांबणार आहे।



P. S. :- 21 July 2010 7:04 PM

तेलगु तर तेलगु, पण आता हिंदी/इंग्रजी न्युज चॅनल्ससुद्धा चंद्राबाबू नायंडूची बाजू घेत आहेत.
ह्याला प्रांतवाद नाही म्हणत का ?
marah

http://www.youtube.com/watch?v=beL4aabWNUA

1 comments:

आनंद पत्रे said...

मुर्खपणा आहे सगळा

Post a Comment

Post a Comment