Wednesday, May 6, 2009

दोन गटांमधे सशस्त्र हाणामारी

शहरातील भाग्यनगर भागात आज दुपारी दोन गटांमधे तुंबळ हाणामारी झाली आहे.
त्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रथमदर्शी तरी हे भांडण राजकीय वादातून झाले आहे असे वाटते.


राज्याचे मुख्यमंत्री आज नांदेडमधे आलेले असल्यामुळे सर्व पोलीस फौजफाटा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.
या कारणामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले.
पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हमलावरांच्या तलवारी, चाकू-सुरे हे सर्व रस्त्यावरच पडून होते.

दिवसाढवळ्या इतके मोठे आणि खुणशी भांडण नांदेडीअन्सनी कधीच पाहिले नसल्यामुळे आज घटनास्थळावर व आजुबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांमधे एकच धावपळ उडाली.
या घटनेमुळे शहरातील भाग्यनगर, स्नेहनगर इत्यादी भागांमधील बाजारपेठ काही काळापुरती बंद झाली होती.

घटनेची अधिक माहिती हातात आल्यावर मी हा टॉपिक परत अपडेट करेन.


(संध्याकाळचे ६ वाजून ३७ मिनिटे)
अधिक माहिती अशी हातात आली आहे की हे भांडण दोन राजकीय नेत्यांच्या पूर्ववैमनस्यातून झाले आहे.

माझ्या एका मित्राने सांगितले की गंभिर जखमींपैकी एकाचा मृत्यु झाला आहे. (अर्थात ही बातमी खोटीसुद्धा असू शकते.)

उद्या वर्तमानपत्रात तपशिलवार माहिती मिळेलच.


एकंदरीत हा सर्व प्रकार अगदी दुर्दैवी म्हणायला हवा.

या घटनेचा निषेध !

0 comments:

Post a Comment

Post a Comment