Thursday, May 28, 2009

घिरट्या घालणारे विमान कुणाचे ?

तामसा, दि.२७ (२८-०५-०९ --> १२:४८)


मागील दोन दिवसांपासून एक विमान सतत तामसा व परिसरात घिरट्या घालत असल्याने चर्चेला विषय बनला आहे.
घिरट्या घालणारे विमान कुणाचे असेल याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता तामसा व परिसरात एक विमान आले व ते २०० - ३०० फुटाच्या उंचीवरून उडू लागले. यामुळे उन्हाच्यावेळी घरात बसलेले नागरिक घाबरून घराबाहेर पडले कारण त्या विमानाचा आवाज न कळाल्याने तो भूकंप तर नाही ना असा प्रश्न पडला.
त्या भितीने सर्व जण घाबरले.
२७ मे रोजी सकाळी ११ वाजता तेच विमान तामसा व परिसरातून पुन्हा एकदा घिरट्या घालून गेल्याने नागरिक आश्चर्यचकीत होऊन भयभीत झाले, कारण ते विमान मागील पाच ते सहा दिवसांपासून सरसम, भोकर, वसमत, तामसा येथेच घिरट्या घालत आहे.
काही गावांतून विमान कोसळल्याच्या अफवासुद्धा पसरत आहेत.
सदरील विमानाबद्दल तामसा पोलिसांना विचारले असता विमानाबद्दल काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील विमान हे सी.आर.पी.एफ. किंवा सैनिकांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमानासारखे दिसून येत होते.
दुसरीकडे या विमानाबाबतची माहिती नांदेड येथील सुरक्षारक्षकाला मोबाईलवरून विचारली असता येथे विमानतळ झाले असल्याचे वैमानिकाला विमानतळाचा बरोबर अंदाज येत नसल्याने ते खालून व दुरून घिरट्या घेत आहे.

हे विमान मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमिताताई चव्हाण यांच्या खाजगी दौऱ्यासाठी आले असल्याचे सांगितले जाते.


--- दैनिक लोकमत

0 comments:

Post a Comment

Post a Comment